आनंदी माणसांचा देश अशी भूतानची जगात ओळख आहे. त्याचे गमक भूतानच्या 'सकल राष्ट्रीय समाधान' ( जीएनएच ) नीतीमध्ये असल्याची माहिती देत प्रभाकर ढगे यांनी 'सुखी माणसांचा देश भूतान' मधून या देशाचा परिचय करून दिला आहे . भारतातील प. बंगालमधील जयगाव व भूतानमधील फुंशोलिंग ही गावे सख्खी शेजारी असली , तरी त्यामधील विरोधाभास चितारताना ते भूतानच्या अंतरंगात डोकावले आहे . बुद्धतत्त्वज्ञानावर आधारलेली अर्थव्यवस्था स्वीकारल्याने जनतेच्या समाधानाला प्राधान्य देणे हे तेथील राष्ट्रीय धोरण असून , बुद्धअर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये व भूतानी जनतेच्या संवादातून उलगडणारा देश यातून दाखविला आहे .
‘सुखी माणसांचा देश भूतान’ या पुस्तकाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4671802466805733589