Summary of the Book
साहित्य संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या आजपर्यंत प्रसिद्ध झालेल्या पाच कथासंग्रहांमधील निवडक अशा वीस कथांचा हा संग्रह.
या वीसही कथांच्या केंद्रभागी भूक आहे, त्याचबरोबरच या मंडळींना "आपल्याला माणूस समजले जावे' हीही भूक आहे. या माणसाचे प्रत्ययकारी चित्रण या कथांमधून आहे.
या कथांच्या निवडीचे व संपादनाचे काम राजन गवस यांनी केले आहे. या कथा समजून घेण्यासाठी गवस यांची प्रस्तावना आवर्जून वाचावी.