Summary of the Book
महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर १९६०-७० चे दशक हे सर्वच आघाड्यांवर स्थित्यंतराचे ठरले. सामाजिक, राजकीय आर्थिक क्षेत्रातील बदलाचे वारे, दुष्काळ, महागाई, भ्रष्टाचार याचा जोर, नव्या चळवळींचा उदय अशा अवस्थांचे प्रतिबिंब साहित्यावरही पडले.
याच काळात वसंत आबाजी डहाके यांनी कविता लिहिणे सुरु केले. साठोत्तरी पिढीतील कवी अशी त्यांची ओळख झाली. गद्यशैली हाताळणा-या त्यांच्या कवितेत बालपणापासून त्या काळातील घटना, नवसाहित्य, बंड, अनुभव यांचे चित्रण दिसते. कीटक, जनावरे, समुद्र, शहरे, सुर्य यांसारख्या प्रतिमा दिसतात.
समकालीन वास्तवातील रुक्षपणा त्यांच्या काही कवितांमधून ठळकपणे दिसतो. त्यांच्या निवडक कविता 'निवडक वसंत आबाजी डहाके' मधून वाचायला मिळतात.