अस्तित्वाच्या पाऊलखुणा
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 149 R 112 / $ 1.44
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
eBook Price: 19% OFF  R 149 R 120 / $ 1.54
Buy eBook
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
गर्दीतला कोणताही एक चेहरा वाटतो तसा कोरा नसतो. त्याच्या मागे उभं असतं एक अख्खं आयुष्य असंख्य घटनांनी भरलेलं आणि त्या प्रत्येक घटनेला असतात पूर्वसंचितांचे अगणित संदर्भ..! कवितेतल्या शब्दांचंही असंच असतं. दुरून निर्विकार वाटणार्‍या प्रत्येक शब्दाच्या गुहेत कविमनातील कैक प्रश्न, संभ्रम, स्वप्नं, इच्छा, सल... यांचा कोलाहल धुमसत असतो.

‘अस्तित्वाच्या पाऊलखुणा’ या आरती देवगांवकर यांच्या कवितासंग्रहातील आशयसंपृक्त कविता वाचताना वाचकांना याची प्रचिती येईल. आरती यांना ‘कोहं?’... मी कोण आहे? हा प्रश्न आतून सतत साद घालत राहतो. म्हणूनच त्यांच्या कवितांमधे ‘मनाच्या तळघरात उतरत जाऊन तळातला शारदीय चंद्र मिळवण्याची आस, शब्दांच्या शस्त्रानं स्वतःला सोलून काढत आतल्या ‘मी’ला शोधून काढण्याची आर्तता आणि स्व-संवाद साधत हृदयस्थाला ओळखण्याची नितांत ओढ’ परोपरीनं डोकावत राहते. या संग्रहातील अहल्या, शूर्पणखा, गांधारी या व्यक्तिरेखा समकालीन परिप्रेक्षातून समजून घेणार्‍या कविता वाचताना त्यामागेही हीच स्व-शोधाची प्रेरणा जाणवते.

मनातले विविध कल्लोळ शब्दांमधून व्यक्त करता करता शब्द या माध्यमाचंही अंतरंग कवीला उमगत जातं. मग कविता हाच काही कवितांचा स्वसंवेद्य विषय होऊन जातो. आरती यांच्या संग्रहातही अशा कविता आहेत. त्यातून त्यांची कवितेविषयीची आस्था दिसून येते. या कवितासंग्रहाला अंजली कुलकर्णी यांनी प्रस्तावना लिहिली असून तिला ‘सत्त्वगुणी कविता’, असे शीर्षक आहे. ते किती सार्थ आहे, हे या कविता वाचताना रसिकांना उमगत जाईल.
आसावरी काकडे
Book Review
Write a review

Chinmayee
14/02/2020

*अस्तित्वाच्या पाऊलखुणा..* कवयित्री 'आरती देवगांवकर' यांचा संग्रह हाती आला तेव्हा, या संग्रहाच्या मुखपृष्ठाने आधीच लक्ष वेधून घेतले होते. लक्षपूर्वक पाहिलं तेव्हा जाणवलं, हे सहज सोपं चित्र नक्कीच नाही. आपले बाईपण मनातून जपत, अर्धवट उघडलेल्या ओठातून काही तरी बोलण्याचा प्रयत्न करणारी, सभोवतालच्या गर्दीतून, कोलाहलातून, अस्तित्वाची पाऊलवाट तयार करून दूर स्वतःची एक स्पष्ट जागा तयार करणारी 'ही' आजची स्त्री आहे ! 'ती' आपल्याला संग्रहात सहज भेटत राहते. या संग्रहाच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. प्रसिद्ध लेखिका, कवयित्री 'आसावरी काकडे' यांनी मलपृष्ठावर नोंदवलेली संग्रहाबद्दलची ठळक वैशिष्ट्ये आहेतच. तसेच प्रस्तावना 'अंजली कुलकर्णी' यांच्या लेखणीतून उतरली आहे. ज्यामध्ये, 'सत्त्वगुणाची कविता' हे शीर्षकच खूप बोलके वाटते. 'डॉ. अनघा लवळेकर' यांच्यासारख्या विदुषींनी याला 'आत्मस्वराची कविता' असे संबोधले आहे. आपल्या या छोट्या पण समर्पक निवेदनातून आपल्याला संग्रह वाचण्याची उत्सुकता त्यांनी वाढवली आहे. 'आरती देवगावकर' यांनी मनोगतात त्यांच्या कवितांचा प्रवास सहज आपल्यासमोर मांडला आहे. आवर्जून वाचवा असाच आहे हा !
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat