Summary of the Book
जी. ए. कुलकर्णी यांच्या कथांना मोठा वाचक वर्ग होता आणि आहे. कथेच्या वेगवेगळ्या रुपानी एकत्र करून त्यांनी समृद्ध, आशयसंपन्न कथा वाचकांना दिल्या. त्यांच्या कथेत मानवी मूल्य हमखास दिसते. सर्वसामान्य, अतिसामान्य आयुष्य त्यांनी कथांमधून उलगडली. त्य्नाच्या डोहकाळीमा या कथासंग्रहातील प्रत्येक कथा याला अनुरूप आहे.
त्यांच्या पहिल्या चार कथासंग्रहातील निवडक कथांचा यात समावेश केला आहे. बळी या कथेत जोगतिणीच्या बेवारशी ठरलेल्या मुलीची अमाशीची हृदयद्रावक कहाणी आहे. यात खेड्यातील जीवन, परंपरा, मानवाचे रानटी रूप दाखवून दिले आहे. माकडाचे काय, माणसाचे या कथेमधून माणसाच्या शेवटच्या दिवसांतील भावना व्यक्त झाल्या आहेत.
तसेच रात्र झाली गोकुळी मध्ये एका गरीब कुटुंबाचे चित्रण आहे. कनिष्ठ समाजाच्या परिस्थितीचे विदारक दर्शन यात घडते. संग्रहातील अन्य कथाही भ्रामक कल्पनेपलीकडील जग आपल्यासमोर मांडतात.
त्या जी. एं.नी केलेल्या रुपकांचा वापरामुळे कथानकाची वास्तवता दाहक मांडण्यास मदत होते. त्यामुळेच हा कथासंग्रह जी. ए. भक्तांसाठी एक खास भेट आहे.