Summary of the Book
देशाच्या इतिहासात १९७१ मध्ये झालेले भारत - पाकिस्तान युद्ध हा महत्वाचा भाग समजला जातो. भारतीय जवानांनी प्राण पणाला लावून विजयश्री खेचून आणली होती. याच युद्धातून बांगलादेशाची निर्मीती झाली. या युद्धाच्या प्रत्यक्ष रणभूमीवर जाऊन प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या कॅप्टन सुरेंद्र ज. सुर्वे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे.
वैयक्तिक आयुष्याला बाजूला सारून युद्धभूमीवर केलेले प्रयाण, रात्रंदिवस केलेला युद्धाचा सराव, युद्धजन्य परिस्थिती, शत्रूचे डावपेच आणि त्याला दिलेले चोख प्रत्युत्तर, तरुण वयात देशासाठी बलिदान देणारे शूरवीर, बंदुका अन् मशीनगन्सचा थरार, छावणीतच साजरे होणारे सण, आपसातील भावनिक नाते अशा अनेक गोष्टी वाचकाला वेगळ्याच विश्वात घेऊन जातात.