Summary of the Book
``वाचता-वाचता एखादी व्यक्तिरेखा पुस्तकातून उठून मनात येऊन बसते. तिच्याशी चटकन एक नाते जुळते. मी लिहितो आहे ते अशा नाते जुळलेल्या माणसांबद्दल. हे नाते जुळणे जितके सुंदर तितकेच दुर्मिळ असते. आजवर वाचलेल्या असंख्य पुस्तकांतून हजारो व्यक्ती नजरेसमोरून सरकून गेल्या आहेत.
त्यांपैकी थोड्यांशीच असे नाते जुळले आहे. कुणी माझीच स्वप्ने आपल्या डोळ्यांनी पाहिली म्हणून, कुणी मला प्रिय अशा मूल्यांसाठी लढा उभारला म्हणून, कुणी मला प्रिय अशा मूल्यांसाठी लढा उभारला म्हणून, कुणी मला जे करावेसे वाटते पण करता येत नाही तेच करीत आहे म्हणून, तर कुणी दुःखाच्या ओझ्याने दबलेला असूनही माणूसपणाची गंगारेषा जपतोय म्हणून...
या सार्याची अदृश्य पावले माझ्याबरोबर चालत असतात. त्यांना माझ्यापासून काहीच नको असते. हवे असते ते मलाच. थोडेसे जगण्याचे बळ, थोडासा दिलासा...’’
अशा वाटेवरल्या सोबत्यांची आठवण जागवणारे हे लेखन. आस्वादक ललितलेखनात आपली स्वतंत्र नवी पायवाट निर्माण करणार्या विजय पाडळकरांचे हे ताजे पुस्तक.