१९७१ ची रोमांचक युद्धगाथा !
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 100 R 75 / $ 0.96
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
eBook Price: 3% OFF  R 100 R 97 / $ 1.24
Buy eBook
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
हे पुस्तक म्हणजे १९७१ चे भारत-पाक युद्ध आणि बंगलादेशच्या निर्माणाची रोचक कथा सांगणारे सुबोध आणि रसाळ पुस्तक आहे.

श्री सुरेन्द्रनाथ निफाडकर यांना संरक्षण दलामधील तीन वर्षांच्या सेवेची पार्श्वभूमी आहे. तसेच विविध दैनिक आणि मासिकांसाठी त्यांनी ५०० हून जास्त लेखही लिहिलेले आहेत. एका साप्ताहिक-मासिकाचे गेली सहा वर्षेसहसंपादक असल्यामुळे विषयज्ञान तर त्यांना आहेच पण नेटक्या शब्दांध्ये ते कसं मांडावे, याची जाणीव सुद्धा या पुस्तकात दिसून येते.

श्री सुरेन्द्रनाथ निफाडकरांनी बराच रिसर्च करून हे पुस्तक लिहिले आहे. स्वत: पत्रकार असल्यामुळे पुस्तकाची भाषा बाळबोध पण ओघवती आहे. मनाची पकड घेणारे वर्णन असल्यामुळे पुस्तक रोचक झाले आहे. अर्थात एका सामान्य नागरिकाच्या ज्या मर्यादा असतात त्या या पुस्तकात जाणवतात. पुस्तकाची रचना सुसंगतवार आहे. भारत-पाक युद्धाची पूर्व पिठिका हे प्रकरण शेवटी ऐवजी सुरवातीलाच घेणे जास्त संयुक्तिक झाले असते. युद्धस्य रम्य कथा निफाडकरांनी पहिल्या सोळा प्रकरणांध्ये सांगितल्या आहेत. गाझी सबमरीन आणि आय.एन.एस. ब्रम्हपुत्रा, पाकिस्तान मधील अंजाम दैनिकामधील या विषयांवरील घोळ, अमरनाथ यात्रेच्या फोटोंना काश्मिरी लोकांचा एक्झोडस म्हणून प्रसिद्ध करणे, फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांच्या सुरस कथा खरेच वाचनीय आहेत. सरळ प्रामाणिक वर्णनांमुळे आपण या घटनांचे प्रत्यक्ष साक्षीदार असल्याप्रमाणेच वाटते.

निफाडकरांच्या ओघवत्या वर्णनांध्ये काही तपशिलाचे दोष आहेत. परंतु दोष हे सर्व सामान्य वाचकांच्या लक्षात ही येणार नाहीत. पण प्रस्तुत समीक्षक लेखकाने या युद्धात प्रत्यक्ष भाग घेतल्या मुळेच त्याला हे लक्षात आले. लेखकांने अगदी सुरवाती पासून युद्धाचे वर्णन केले आहे. युद्धाची कारणे काय होती, इंदिरा गांधींची व्यूहरचना व राजनैतिक डावपेच काय होते,नौदल आणि वायुदल यांच्या योजना काय होत्या? छंब-एरियात मध्ये कशी टँक बॅटल झाली, शक्करगढ सॅलीएंट मध्ये खेत्रपाल आणि होशियार सिंग कसे लढलेत आणि ढाक्याचे पतन होऊन पाकिस्तान चे दोन तुकडे कसे झालेत हे वाचतांना अंगावर काटा येतो, रोमांच उभे राहतात. आणि यातच लेखकाच्या शैलीची प्रतिभा आणि वाचकाला बांधून ठेवण्याची हातोटी दिसून पडते. निफाडकरांनी श्रीमती इंदिरा गांधी, बंगबंधु शेख मुजीब, सॅम मानेकशॉ, नझरूल इस्लाम यांचे आलेखही छान काढले आहेत. युद्धाच्या कथांशी समांतर अशा या व्यक्तिरेषा आहेत आणि लेखकाने त्यांना पूर्ण न्याय दिला आहे.

१९७१ च्या लढ्याबद्दल अनेक इंग्रजी पुस्तके आहेत. मराठीत मात्र अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकीही नाहीत. या पोर्शभूमीवर निफा डकरांची ही रोमांचक युद्धगाथा ठळकपणाने समोर येते. सामान्य वाचकाला समजेल अशा भाषेत संगतवार आणि क्रमश: युद्धपट त्यांनी उलगडला आहे. ओघवत्या भाषेमुळे तो वाचनीयही झाला आहे. अशा भूतपूर्व सैनिकाचा हा प्रामाणिक प्रयत्न वाखाणण्याजोगा व संग्राह्य आहे.
Book Review
Write a review

arati karode
07 Aug 2015 05 30 AM

हे पुस्तक वाचताना आपल्या डोळ्या समोर ती ती वेळ ऊभी होते. त्या युद्धात आपण काय मिळवले, काय गमावले हे फार सुंदर रित्या मांडल्या गेलं आहे. असे च दुसरे पुस्तक होऊ द्यावे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat