Summary of the Book
मराठवाडा जुलुमी राजवटीतून मुक्त होऊन ७० वर्षाचा कालावधी लोटला तरीसुद्धा अजूनही मराठवाड्यातील जनता, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते निष्क्रिय जरी नसले तरी फारसे सक्रीय आहेत, असे दिसून येत नाही. म्हणूनच मराठवाड्याच्या वाटेला आलेल्या उपेक्षेतून सुटका होणे दुष्करच वाटते. मुख्य म्हणजे १९४८ ला निजामी राजवटीतून मुक्त झाल्यापासून आजपावेतो म्हणजे अदमासे ७० वर्षे मराठवाड्याची उपेक्षाच होत आहे. याला मराठवाड्यातील सर्वसाधारण जनतेची उदासीनता आणि राजकीय नेत्यांची निष्क्रियता बऱ्याच प्रमाणात कारणीभूत आहे.
आपल्या विकासाच्या प्रश्नांबद्दल उदासीनता असल्यास एखादा प्रदेश मागासलेला कसा राहतो याचे मराठवाडा एक उत्कृष्ट उदाहरण आहे.
मराठवाड्यात जनजागृतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी, राजकीय नेते आणि विचारवंतांनी पुढाकार घेऊन जास्त कृतीशील प्रयत्न करून कार्य करणे अगत्याचे झाले आहे. ह्या पुस्तकाद्वारे मराठवाड्याच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी एक विकास आराखडा सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा पाठपुरावा कसोशीने केल्यास मराठवाड्याच्या विकासाची वाटचाल योग्य दिशा घेऊ शकेल अशी खात्री वाटते. मराठवाड्यासारख्या अन्य मागास विभागाचे विकासाचे प्रश्नसुद्धा अशा प्रयत्नाने मार्गी लावणे सुलभ होईल. मराठवाड्याचा विकास म्हणजे महाराष्ट्राचाच विकास होय हेही लक्षात घेतले पाहिजे.