Summary of the Book
इतिहास हा नेहमी जेत्यांचाच असतो . पराभूतांनाही इतिहास जवळही कर नाही. मग सर्वसामान्यांची वास्तपुस्त कोण कशाला करील ? 'आयच्यान खरा सांगण' हे त्यावरचं उत्तर आहे. सर्वसामान्यांची संख्या लाखांमध्ये किंवा त्याच्याही पटीत भरते. असामान्य मोजकेच असतात. परंतु यात एक तिसरा दुर्लक्षित वर्ग आहे आणि तो म्हणजे जे असामान्य नाहीत;परंतु सर्वसामान्यही नाहीत. मोहन साटम या वर्गातले आहेत. मोहन साटम यांची आणखी एक ओळख म्हणजे मराठी रंगभूमीवरच्या ज्येष्ठ- श्रेष्ठ कलावंतांबरोबर वावरून देखील त्यांनी कोणाशी उगाचच बरोबरी केली नाही. एरवी हिमायाला न्यूनगंड देणाऱ्या टेकड्या आम्ही काय कमी नाही पहिल्या !
ह्या चाकरमान्यांनी रंगभूमीच्या पडत्या काळात फार मोठं योगदान दिलंय. रंगभूमी कोसळू दिली नाही. ह्यांच्या नाटकांचे प्रयोग गावाकडे, मुंबईत झडतच होते. त्यांच्या योगदानाची दखल नाटक चळवळीत फारच कमी प्रमाणात घेतली गेली. ही माझी खंत माझ्या एकदोन व्याखायानांत आवर्जून व्यक्त केली आहे. आता ती रंगभूमी बोलतेय.... आपले कर्मभोग सांगतेय .... हे चाकरमानी पोटापाण्यासाठी मुंबईला येतात .... बरोबरच्या तुटपुंज्या सामानासोबत काळजात लपवून 'नाटक' आणतात ; आणि त्यांचं इवलंसं झाड आयुष्भर रक्ताचं खतपाणी घालून वाढवतात. त्यांचा हा आलेख म्हणजे ... मोहन साटम यांचं ' आयच्यान खरा सांगन !' पुस्तक. वाचालं, अत्यानंद झाला !