Summary of the Book
पत्रकार व साहित्यिक यांना पुरोगामी वा प्रतिगामी असायची कुठलीही गरज नसते. समाजाचे प्रबोधन हे अशा वर्गाचे खरे कर्तव्य असते. तेव्हा असा वर्ग विचारधारेचा गुलाम होतो. आणि खोटीनाटी प्रमाणपत्रे पुरवून जनतेची दिशाभूल करण्यास लावण्यात पुढाकार घेतो, तेव्हा त्याचेही दिवाळे वाजू लागते. आज वर्तमानपत्रे, वाहिन्या किंवा साहित्य क्षेत्राची त्यामुळेच धूळधाण उडालेली आहे. नावाजलेले संपादक वा माध्यमे दिवाळखोरीत गेली आहेत. हमीद दलवाईंच्या पुरोगामी विचार वा भूमिकांना हेच लोक पायदळी तुडवत असतील, तर त्यांचे पुरोगामी मुखवटे फेडण्याची गरज आहे आणि त्या मुखवट्याआड वाळलेल्या पुरोगामी जमातीचा खरा चेहरा सामाम्य माणसाला दाखवणे अगत्याचे आहे.
एकवेळ जिहादी कसाब किंवा तालिबानी ओसामा परवडला, कारण तो समोरून येणारा शत्रू असतो. पण जमाते पुरोगामी हा गाफील ठेवून मित्ररूपाने येणारा राक्षस असतो. त्याच्याविषयी जनतेला सातत्याने सावध करणे व त्याच्या मायावी रुपामागचा हिडीस चेहरा लोकांना दृग्गोचर करून दाखवणे, हे खरेखुरे पुरोगामी व प्रगतिशील कार्य आहे.