Hard Copy Price:
25% OFF R 400R 300
/ $
3.85
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
बाजीरावांनी हिंदवी स्वराज्याची कीर्ती आकाशाशी भिडसावल्याचे ठाऊक असताना, राजा केळकर वस्तुसंग्रहालयाचे निर्माते केळकरकाकांची भेट घडली. इतिहासकालीन पत्रे वाचण्याचीही संधी मिळाली. पेशव्यांनी केलेली मराठ्यांचे घोडे सतलजचे पाणि पिऊन बादशाहास नमवतील, हि घोषणा कळली. तत्कालीन इतिहास अभ्यासण्यात त्यांची मदत झाली. महाराष्ट्रात रम्यभीषण नाट्य घडले. कुटुंबप्रेम नि हिंदवी स्वराज्याच्या विकासास जीवन समजणाऱ्या थोरल्या बाजीरावांच्या जीवनात मस्तानी प्रवेशली. रोमियो - ज्युलियट वगैरे विख्यात प्रेमिकांच्या जोड्या फक्त ओरेम करणाऱ्या ! पण बाजीराव म्हणजे शौर्य, धैर्य, चातुर्य,कुशल राजकारण ! त्यांच्या संदर्भात असंख्य अफवा शत्रूस भयभीत करत. महाराणा प्रताप यांच्या चेतकहून बाजीरावांच्या (अबलख ) अस्मानचे कर्तृत्व उणे नव्हेते. तरी चेतकाप्रमाणे अस्मान विखय्त नाही. मस्तानीही देखणी नर्तकीच नव्हती. समर्पण नि शौर्य ही तिची बलस्थाने असल्याने तिने पेशव्यांचे हृदय काबीज केले. पेशव्यांच्या मर्दांनी सौदर्यावर भाळलेल्या निजामाच्या स्त्रियांनी मोती उथळून दृष्ट काढली तेव्हा पेशवे नजर झुकवून उद्गारले - काशीबाई मस्तानीचे महत्व स्वीकारत. प्रेमाचं करणाऱ्या विख्यात प्रेमिकांपेक्षा या त्रिकुटाचे भावबंध बिल्वपत्रासारखे पावन ! तरी .... महाराष्ट्र स्वराजनांवर कोरडे ओढणारा ! म्हणून शतकांसाठी आदरणीय ठरण्याजोगे पावन प्रेम वर्तमानाच्या टाचक्या नजरेत भरले नाही. हा निष्पाप संबंध महाराष्ट्राने सवंग लफडे ठरवण्याचे कोतेपणा केला. हे केळकरकाकांच्या भेटीत नि नंतर अभ्यासात जाणवले. बाजीराव- काशीबाई - मस्तानी या त्रिदलाच्या सद्भावनेस दाद देणारे वास्तववादी लेखनकेल्याविना हे 'झाड' मला सोडणार नाही, हे जाणवले. म्हणून हा लेखनप्रपंच !