Hard Copy Price:
25% OFF R 175R 131
/ $
1.87
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
डॉ. सोपान बोराटे यांनी या एन. एस. एस. चळवळीला गती आणि दिशा देण्यासाठी हा गीत- कवितांचा संग्रह निर्माण केला आहे. समाजातील तळागाळातील माणसाचे रोजचे जीवन सुकर होण्यासाठी, राष्ट्राच्या नव्या उभारणीसाठी मला हा संग्रह महत्त्वाचा वाटतो. अन्न, वस्त्र, निवारा ह्या तापसाच्या मूलभूत गरजा म्हणून आपण सांगतो. आता त्यात शिक्षण, आरोग्य आणि बांधिलकी यांचादेखील अंतर्भाव होणे गरजेचे आहे. या संग्रहाच्या साठ कविता/गीतांच्या माध्यमातून समाजमन जागे करण्याचा अट्टाहास कवी तथा गीतकार डॉ. सोपान बोराटे यांनी ठेवला आहे, विज्ञान, तंत्रज्ञान, व्यसनमुक्ती, आंतरभारती, साक्षरता गीत, प्रौढ शिक्षण, निश्चय, हाक, जोडो भारत, प्रबोधनाचा अभंग, प्रार्थना, भ्रष्ट व्यवस्था, प्रदूषण, इतिहास अशा अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर गीतांची रचना करून समाजप्रति असणारी तळमळ अधोरेखित होते. "आम्ही समाजाचं काही देणं लागतो!" या भूमिकेतून विद्यार्थी नजरेसमोर ठेवून डॉ. सोपान बोराटे यांनी गीतांची रचना केली आहे. स्त्री सबलीकरणाचा आणि सक्षमीकरणाचा नारा देताना डॉ. सोपान बोराटे म्हणतात- 'चला मुलांनो.....!' महिला सबलीकरण झालंय? खूप काम बाकी आहे आपण शिकलो, पुढे गेलो आई-बहीण बाकी आहे. अर्ध्या जगाचं जगणं सक्षम आणि आत्मनिर्भर बनवायचे असेल तर माय-बहीण-मुलगी यांनी शिक्षणाचा ध्यास घेतला पाहिजे.