Summary of the Book
व्यापाराच्या निमित्ताने भारतात परकियांचा प्रवेश होऊ लागला होता, तेव्हा सागरी संरक्षणाचे महत्व ओळखून शिवाजी महाराजांनी कल्याण जिंकून दुर्गादीचा किल्ला बांधला व तेथे मराठ्यांच्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली. शिवरायांनी अनेक सागरी किल्ले बांधले, काहींचा डागडुजी, पुनर्बांधणी केली.
त्यातील बहुतेक किल्ल्यांची आता दुरवस्था आहे. काही अजूनही तग धरून आहेत. काही किल्ल्यांच्या भाग पाडून तेथे अनेक 'व्यवसाय ' सुरु आहेत. काहींवर खासगी मालकी आहे. अशा सर्व किल्ल्यांवर फिरून त्यांचा इतिहास, बांधणी, तेथे घडलेल्या घटना यांविषयी व किल्ल्यांचे सध्याचे वास्तव भगवान चिले यांनी 'वेध जलदुर्गांचा 'मधून मांडले आहे.
ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील डहाणू, तारापूर, शिरगाव, मढ किल्ला व माहिमचा किल्ला, खांदेरी - उंदेरी, रेवदंडा, जंजिरा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग या नेहमीच्या किल्ल्यांबरोबरच फत्तेगड, गोवाकड, भरतगड, सामराजगड, सर्जेकोट, मनरंजन कोट आदी अपिरीचित अशा सुमारे ६९ जलदुर्गांची माहिती व महती यात दिली आहे.
गडाचे स्थान समजण्यासाठी सोपे नकाशे, जलदुर्गांचे स्वतंत्र नकाशे, दुर्मिळ छायाचित्रे, तसेच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढलेली जलदुर्गांची सुंदर छायाचित्रे हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.