Summary of the Book
शोनार बांगलाच्या निर्मितीच्या कार्यात बांगलातील असंख्य ज्ञात आणि अज्ञात, असैनिक तरुण आणि तरुणींच्या बरोबरच, अनेक बालवीरांनी जिवावर उदार होऊन क्रांतियुद्धात भाग घेतला. अंगावर पडेल ती जबाबदारी स्वीकारली. भारतीय सैनिकांच्या खांद्याला खांदा भिडवून प्रसंगी ते रणांगणावरही उतरले. बांगला-मुक्तिसंग्रामात अग्रेसर होणार्या मुक्ति-सैनिकांचा मार्ग सुकर आणि सुसह्य होण्यासाठी, त्यांच्यापैकी कित्येकांनी बलिदान केले. असल्या संग्रामात शत्रूच्या गोटातील अचूक बातम्या मिळवून आणण्याला अत्यत महत्त्व असते. आणि ती महत्त्वाची कामगिरी शोनार बांगलातील या लहान-थोर वीरांनी असामान्य धैर्याने आणि चातुर्याने पार पाडली. त्यांच्या या त्यागाच्या आणि पराक्रमाच्या कथा.