Summary of the Book
घरातील मुलांची दहावी - बारावी सुरु झाली की करिअरची चर्चा सुरु होते. त्यासाठी कोणता अभ्यासक्रम घ्यायचा, पुढे जास्त 'स्कोप' कशात आहे, हे पाहून, ऐकून संबधित शाखेत मुलाला शिकवायचे किंवा दहावी - बारावीत ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले की साहजिकच विज्ञान शाखेत जायचे, हा दृढ समज अजूनही आहे.
परीक्षांमध्ये एकूण टक्केवारी जास्त असली तरी मुलाला सर्वात जास्त आवड कोणत्या विषयात आहे, हे लक्षात घ्यावे लागते. याचा फायदा त्याच्या करिअरची गाडी सुरळीत चालण्यासाठी होतो, याचे भान डॉ. श्रीराम गीत यांनी 'करिअरची दिशा' मधून दाखवून दिले आहे.
मुलांच्या करिअरचे प्लॅनिंग, शिक्षण, व्यवसायाची नवी क्षितिजे, समुपदेशनाचे महत्त्व, दहावीनंतरची निवड कशी करावी, आत्मपरीक्षणाचा फायदा, विविध शैक्षणिक शाखांची बलस्थाने, सीए अभ्यासक्रम, आयटी क्षेत्र, इंजिनीअरिंगला कोणी प्रवेश घ्यावा, सीईटी परीक्षा, ध्येयनिश्चिती, करिअर फेअरची आवश्यकता याबद्दल मार्गदर्शन केले आहे; तसेच पदवीनंतर व्यवसाय नोकरीची वाटचाल कशी असावी, वैद्यकशास्त्र शाखेची वस्तुस्थिती, करिअरबद्दलचा व्यावहारिक अनुभव यात सांगितला आहे.