Summary of the Book
'अविचारातुनी नाशचि घडतो, पुत्र दुर्योधना, सत्य स्थिती तू जान अभाग्या विवेक सद्भावना' विदुराने उपदेशातून दिलेला इशारा धुडकावून दुर्योधन पांडवांविरुद्ध युद्ध पुकारतो. अधर्माच्या या युद्धाचे महाभारत शशिकांत पानट यांनी असे गीतांमधून सांगितले आहे.
गीत महाभारताची सुरुवात करताना ते म्हणतात, 'मंत्राचा हा घोष घुमतसे, हस्तिनापूर नगरी, गृहगृहांतून वेद नांदती, या नंदन भुवनी.' महायुद्धाची तयारी सुरू झाल्यावर पांडव आणि कौरव मदतीसाठी कृष्णाकडे जातात. तेव्हा कृष्ण म्हणतो, कथ पार्था तुज काय हवे?, नारायण की सैन्य हवे?, 'युद्धभूमीवर द्विधा मन:स्थितीतील अर्जुन म्हणतो, 'अनर्थ घडला माझ्या हातुन, पाप प्राक्तनी आले, माधवा असे कसे रे घडले?'