Summary of the Book
कथा वाचताना त्याचे बीज काही वेळा एकसारखे वाटले, तरी त्यातील अर्थ अनेक निघू शकतात. विद्याधर पुंडलिक याच्या 'देवचाफा'मधील कथाही अशाच आहे. माणसामाणसांतील नाती वरवर सामान्य वाटत असली, तरी त्याचे मूळ वेगळे असू शकते, हे यातील कथांमधून दिसते. नेहमीच्या विषयांवरील; पण त्यातून वेगळा संदर्भ, सामाजिक विचार या कथा देतात. 'अखेरची रात्र' मधून कर्ण व कुंती यांच्या संदर्भातील थोडी परिचित कथा असली तरी त्यातील दृष्टिकोन नवा आहे. 'सती' कथेत राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमीवर घडणारी कथा वेगळी ठरते. त्यामुळेच या कथा वाचताना नवे वाचल्याचे समाधान मिळते.