Summary of the Book
बहिणाबाईंची कविता खूप लोकप्रिय झाली, त्याला कारण म्हणजे बहिणाबाईंची सोपी भाषा आणि रोजच्या जगण्यातील दिलेले दाखले. कवी इंद्रजित भालेराव यांनाही बहिणाबाईंच्या कवितांनी लहानपणीच भुरळ घातली आणि मग या कविता वाचण्याचा छंदच त्यांना लागला. त्यातूनच पुढे त्यांनी बहिणाबाईंच्या कवितांचा अभ्यास सुरू केला.
"खान्देशचा मळा आणि मराठवाड्याचा गळा' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भालेराव यांनी केले. त्यात बहिणाबाईंच्या कवितांशी त्यांचा जवळून परिचय झाला. बहिणाबाईंच्या कवितेचा सखोल अभ्यास करून भालेराव यांनी "बहिणाबाई ः ध्यास आणि अभ्यास' हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात भालेराव यांच्या कार्यक्रमातील बहिणाबाईंच्या कवितेबद्दल आलेले संदर्भ, त्यांच्या कवितांचे अर्थासह विवेचन वाचायला मिळते. कवितेचा हा रसास्वाद अधिक वाचनीय झाला आहे.