Summary of the Book
भारत स्वतंत्र झाल्यापासून १९४७ ते २०१४ या ६७ वर्षांत भारतात १५ पंतप्रधान झाले. पंडित जवाहरलाल नेहरू हे १९४७ ते १९६४ असे सलग १७ वर्षे पंतप्रधान होते. तत्ववेत्ता - प्रशासक असलेल्या पं. नेहरू यांच्या काळात भारतात अनेक उद्योगांचा पाया घातला गेला. गुलझारीलाल नंदा हे जरी हंगामी पंतप्रधान असले, तरी गोहत्त्या बंदीच्या संदर्भात त्यांनी महत्वाची कामगिरी बजावली.
तसेच नैतिकता, नीतीमत्ता, नैतिक जबाबदारी, सचोटी, प्रामाणिकपणा, संवेदनशीलता हे गुण असलेले लालबहादूर शास्त्री. महिला असूनही देशाची धुरा समर्थपणे पेलणाऱ्या व देशाला प्रगतीच्या मार्गावर नेणाऱ्या इंदिरा गांधी, विगर काँग्रेसी सरकार सत्तेवर आल्यानंतर मोरारजी देसाई, चौधरी चरणसिंग, चंद्रशेखर, एच. डी. देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल,
कॉंग्रेस सरकारच्या काळात राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंह राव, डॉ. मनमोहनसिंग व भारतीय जनता पक्षाच्या हातात सत्ता सोपविल्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व सध्याचे पंतप्रधान मोदी या सर्वांची ओळख, त्यांचे कार्यकर्तुत्व, त्यांच्या काळात घडलेल्या घटना यावर डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी 'आपले पंतप्रधान'मधून प्रकाश टाकला आहे.