Summary of the Book
"अलिकडच्या काळात अनेक कवी कविता लिहिताना दिसतात परंतु त्यांचे विषय, आशय लिहिण्याची आगळी रीत या पेक्षा
'दुपारची सावली' तील कविता हि निराळी वाटते..." ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आनंद यादव यांनी या कविता संग्रहाला दिलेल्या
या सुयोग्य पावतीची अनुभूती हा काव्यसंग्रह वाचताना येते.
"जीवनातल्या साऱ्या क्षणांना टिपणं नि त्या स्वर-व्यंजनांच्या आरोहावरोहातून व्यक्तं करणं, हा 'दुपारच्या सावल्यांचा' स्थायी भाव आहे..."
असा आशीर्वाद पद्मश्री डॉ. यू. म. पठाण यांनी या काव्य संग्रहाला दिला आहे.
"वाचकांचा जो हुंदका, तोच माझा श्वास आहे
लेखणीतून अशीच अवतरली कविता माझी..."
अशा प्रामाणिक संस्कारांतून घडलेल्या कवितांच्या माध्यमातून कवीने समाजकारण, राजकारण, भक्ती रस, भाव रस, प्रेम-विरह इ.
विविध विषयांवर मार्मिक भाष्य केलं आहे.
या काव्य संग्रहाच्या निर्मिती मागील कवीची भूमिका त्यांच्याच शब्दांत...
"ताण तणावाचा पेटता वणवा,
तन मनाची होते काहिली
तेव्हा कविता देते सुखद गारवा,
जशी पांथस्थाला दुपारची सावली !!! "