Summary of the Book
बालपणीच्या सुखद, रम्य आठवणींने आयुष्याच्या उत्तरार्धही सुगंधित होतो; पण ज्यांचे बालपण करपलेले आहे ज्यांना मायेची उब देणारे घर, आई वडील, बहिण-भाऊ, नातेवाईक यांच्यापैकी कोणी नाही अशा निराधारांचे जीवन कसे असेल ? रामनाथ चव्हाण यांनी अहसा मुलांची जीवन कहाणी 'घाणेरीची फुलं' मधून सांगितली आहे.
परिस्थितीचे चटके खाऊन हि मुले रोजचे आयुष्य भीक मागत, होटेलमध्ये कपबशा विसळत, बुटपॉलिश करीत, रेल्वेत गाणी म्हणत घालवीत असतात. तो त्यांच्या कमाईचा व जगण्याचा मार्ग असतो. या मुलांच्या दुर्लक्षित जगण्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न यात केला आहे.