Summary of the Book
महाकवी कुलगुरू कालिदासांची 'ऋतुसंहार' ही पहिली कलाकृती. त्यांच्या मेघदूताप्रमाणे 'ऋतुसंहार' हे देखील एक खंडकाव्य आहे.
ऋतुसंहार म्हणजे ऋतुंची माला किंवा ऋतुमाला होय. या काव्याचे ना कथानक, ना कथासूत्र, ना कोणी नायक,ना कोणी पात्र. निसर्गच
हा या काव्याचा नायक. ऋतूचा निसर्गावरील परिणाम व ऋतूंचा युवाविश्वासवर व प्रेमींच्या प्रेमिजीवनावर होणारा परिणाम
कालिदासांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर या काव्यातून मांडला आहे. शृंगाररसराज कालिदासांच्या या काव्यात ग्रीष्माच्या
दाहकतेपासून सुरु होणारा ऋतुप्रवास वसंत ऋतूच्या आल्हादात संपतो.
संत ज्ञानेश्वरांनीही ज्ञानेश्वरीमध्ये ऋतूंचा उल्लेख असलेल्या ओव्यांमधून आपल्याला निसर्गातील तत्वबोध लक्षात आणून दिला आहे.
निसर्गाच्या प्रत्येक रुपांकडून माणसाला शिकण्यासारखं आहे. कोणी पाहो न पाहो,कौतुक होवो अथवा न होवो,आपण जिथं आहोत
तिथं फुलायचे, बहरायचे, मोहोरायचे.आपल्याजवळ जे जे उत्तम, सुंदर,उत्कृष्ठ आहे ते दोन्ही हातांनी मुक्तपणे उधळायचे.आपलं काम
आपण प्रामाणिकपणे नियमित, वेळेवर करायचं आणि काम संपलं की पुन्हा अज्ञात व्हायचं. हे निसर्गाचे तत्व माणसांनाही लागू पडेल
नाही का ? म्हणूनच वाटते की निसर्गासारखे दुसरे महाकाव्य नाही.