Summary of the Book
'पाण्यावरचे दिवे' हे पुस्तकाचे शीर्षक अत्यंत समर्पक आहे. अथांग जलाशयातील पाण्यावर दिवे सोडल्यावर त्या दिव्यांच्या प्रकाशामुळे सारा परिसर उजळून निघतो. परंतु क्षणभरच. पाण्याची एखादी लाट येताच हे दिवे हेलकावू लागतात आणि काही काळ प्रसन्न उजेड देणारे हे दिवे क्षणात नष्ट होतील की काय, अशी भीती वाटू लागते. सदर- लेखनाचेही असेच असते. असे लेखन वाचल्यावर काही काळ बरे वाटते. परंतु पुढे पुढे त्याचे तात्कालिकपण जाणवू लागते. 'पाण्यावरचे दिवे' या पुस्तकात विषयांचे वैविध्य आढळते, त्याचबरोबर या लेखांमध्ये एक समान सूत्र असल्याचेही जाणवते.