Hard Copy Price:
25% OFF R 600R 450
/ $
5.77
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
१९८६ साली श्री अविनाश धर्माधिकारी यांची IAS सेवेत निवड झाली . त्या वर्षी IAS सेवेत महाराष्ट्रातून निवडले गेलेले ते 'एकमेव ' अधिकारी होते. सेवेत असतानाही त्यांनी आपल्या जबाबदाऱ्या उत्तम रीतीने सांभाळून स्पर्धापरीक्षा मार्गदर्शनासाठी अनेक कार्यशाळा होत्या. सात वर्षे अशा प्रकारे कार्यशाळा घेतल्यानंतर १९९३ साली त्यांनी '१, विजयपथ 'हे पुस्तक लिहिले. त्यात त्यांनी सर्वांत जास्त स्पर्धात्मक असलेल्या UPSC नागरी सेवा परीक्षेपासून अन्य सर्व स्पर्धापरीक्षांना पथदर्शक ठरेल; इतकेच नव्हे तर उभ्या आयुष्यासाठी मार्गदर्शक ठरेल, असे लेखन केले. 'नवा विजयपथ'असे आता नामकरण केलेली हि त्याच पुस्तकाची, मुळ गाभा कायम ठेवून तयार केलेली अद्ययावत आवृत्ती आहे. श्री. धर्माधिकारींना IAS काळात 'महाराष्ट्रात केडर' मिळाले होते. त्यांनी काम केलेली महत्वाची पदे याप्रमाणे- फलटण प्रांताचे उपविभागीय अधिकारी, राज्याच्या मुख्य सचिवांचे विशेष कार्य अधिकारी, पुराभिलेख विभागाचे संचालक,रत्नागिरी व अमरावती जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी, महिला व बालकल्याण विभागाचे संचालक, रायगडचे जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्र्यांचे उपसचिव. २००१ साली नेहरू युवा केंद्राचे (NYKS) ते महासंचालक होते. दहा वर्षाच्या सेवेनंतर IAS सेवेचा राजीनामा देऊन, त्यांनी १० ऑगस्ट १९९६ रोजी 'चाणक्य मंडळ परिवार' या शैक्षणिक न्यासाची स्थापना केली. गेल्या दोन दशकांपेक्षा जास्त काळातल्या वाटचालीत श्री. धर्माधिकारींच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेत तयार होऊन हजारापेक्षा जास्त प्रशासकीय अधिकारी राष्ट्रीय पातळीला आणि अडीच हजारपेक्षा जास्त प्रशाकीय अधिकारी राज्य पातळीला 'कार्यकर्ता अधिकारी' या मनोभूमिकेतून कार्यरत आहेत.