Summary of the Book
जगताना निसटलेले क्षण म्हणजे ही कविता, असे कवी नंदू मुलमुले यांनी या कवितासंग्रहाच्या मनोगतात म्हटले आहे. हे निसटलेले क्षण संग्रहामध्ये हाती येतात. निसर्ग, माणूस, आधुनिक जगाचे प्रश्न यांच्या कवितेत डोकावतात. कवी आपल्या निरीक्षण शक्तीने आसपास निरखतो आणि त्यावर मर्मग्राही भाष्यही करतो.
बदललेल्या ऋतूमानाकडे लक्ष वेधणाऱ्या 'क्रम' या कवितेतील कागदाच्या होडीचे रूपक भावते. 'पत्र' हे स्वगताच्या अंगाने जाते. 'बातम्या' ही कविता वास्तवावर भेदक प्रहार करणारी आहे. चिंतनशीलता हे या कवितांचे वैशिष्ट्य आहे. हळूहळू लक्षात येतं, पायच दुभंगले आहेत, तळव्यापासून मनापर्यंत...' अशी अल्पाक्षरी आणि अर्थवाही कविताही संग्रहात भेटते.