Summary of the Book
गेलेली वेळ परत येत नाही, असे म्हटले जाते. वेळेचे महत्व जाणणारी व्यक्ती जीवनात यशस्वी ठरते. ठरविलेले ध्येय घाटण्यासाठी आयुष्यात वेळ कमी व कामे जास्त अशी स्थिती असते. यासाठी वेळेचे नियोजन करणे आवश्यक ठरते, असे सांगून प्रा. नामदेवराव जाधव यांनी 'प्राईम टाईम मॅनेजमेंट'मधून नियोजन करायला वेळ काढला की कमी वेळेत जास्त काम करणे कसे शक्य होते हे स्पष्ट केले आहे.
वेळ हि आपल्याला नैसर्गिकपणे मिळालेली संपत्ती असल्याने वेळ कमवली की याच कमाईतून पैसा, यश कमविता येते, हे सांगताना प्रवासावर नव्हे तर प्रवासाच्या वेगावर खर्च करणे योग्य ठरते, हा पहिला धडा यात आहे. काम करण्यासाठी उर्जेची गरज, उपकार मूल्याचे मोल, छोट्या गोष्टींना कमी न लेखणे, वेळेचे नियोजन शिकण्यापूर्वी ध्येय ठरवायला शिकले तर तेव्हाच सर्वोत्तम योजना साकार होतात, असे लेखकाने म्हटले आहे.
आयुष्याची काळजी करण्यापेक्षा आजच्या दिवसाची काळजी घेऊन उद्याचे नियोजन तयार ठेवणे, श्रीमंत होणाऱ्या माणसाची कामाची पद्धत, कामाच्या गोष्टीसाठी भरपूर वेळ देणे, कार्यालयीन वेळेचा काटेकोर वापर, मोबाईलच्या योग्य वापरासाठी घ्यावयाची दक्षता, प्राईम टाईम मॅनेजमेंट केल्याने होणारे फायदे सांगितले आहेत.