Hard Copy Price:
25% OFF R 130R 97
/ $
1.24
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
भारतीय इतिहासातील एक अभूतपूर्व घटना म्हणजे , सतराव्या शतकात महाराष्ट्रात स्थापित झालेले हिंदवी स्वराज्य होय . हे स्वराज्य म्हणजे प्रादेशिक अस्मितेचा एक नवा अविष्कार होता . मराठी मनाला सदोदित स्फुरण देणाऱ्या या मराठ्यांच्या राजसत्तेने स्वातंत्र्याचे बिजारोपण केले . हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचा मार्ग सुकर करणाऱ्या आणि ते स्थापन झाल्यावर त्याचा विकास आणि विस्तार करण्याच्या कामी मराठी सरदारांचे योगदान महत्वपूर्ण राहीले आहे . या कामी मराठा सरदारांच्या स्त्रियाही त्यांच्या तोडीनेच काम करीत होत्या . आपल्या जहागिरीचे व्यवस्थापन . तिचे संरक्षण , आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणे आणि या शिवाय काही घराण्याकडे असलेल्या अष्टप्रधानमंडळाची जबाबदारीसुद्धा या स्त्रियांनी यशस्वीपणे सांभाळली . पती निधनानंतर अतिव दु:खाचा डोंगर कोसळूनही त्या जराही ढासळल्या नाहीत .तर 'स्त्री ही अबला' या प्रतिमेला तडा देऊन त्यांनी 'सबला' असल्याचे सिद्ध केले .केवळ प्रशासन आणि राज्यकारभार न पाहता प्रत्यक्ष रणांगणावरही या रणरागिंणीनी आपली छाप पाडली . या स्त्रियांच्या कार्यकर्तुत्वाचा हा आलेख प्रस्तुत ग्रंथाच्या लेखिका डॉ. स्मिता साहेबराव शिंदे यांनी या ग्रंथातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे . अभ्यासक आणि वाचक या ग्रंथाचे स्वागत करतील हीच अपेक्षा !