बालसंस्कार नीति
9788194046820 Aarogyavishayak Arogya Arogyavishayak Balsanskar Niti Health Kisan Dagadu Shinde Regarding Health Varada Prakashan आरोग्य आरोग्यविषयक किसन दगडू शिंदे बालसंस्कार नीति वरदा प्रकाशन
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 15% OFF
R 700 R 595 / $ 7.63
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
मुलांच्या संस्कार संकल्पनेतील पालकांची महत्वकांक्षा व त्याचे दुसरे टोक अतिमहत्वाकांक्षा यांच्यामधील सुवर्णमध्य पालकांनाच शोधावा लागतो. कोणत्याही योग्यायोग्य क्षेत्रामध्ये प्रामाणिक प्रयत्न केले तर व्यक्तीसापेक्ष, अत्युच्च यश गाठल्यावर, प्राप्त यशाचा उपयोग, स्वतःबरोबर समाजाला करून दिला की सामाजिक ऋण फेडण्याची संधी प्रत्येकाला नैसर्गिकरित्या प्राप्त होते. सामाजिक ऋणांच्या परतफेडीतील सातत्य टिकवण्यासाठी सक्षम भावी पिढीचा भक्कम पाया मुलांच्या संस्कार नीतितील कार्यप्रणालीतून प्रस्थापित करणे ही आधुनिक काळाची गरज बनली आहे.
अभ्यास व संस्कार घरापासून सुरु होतात. बाल्यावस्थेतील मुलांना प्रामुख्याने शाळेतून प्राप्त होत असतात. मुलांना चांगले शिकविले तर चांगलेच ग्रहण करतात व त्याप्रमाणे जिवनात अवलंबही करतात. सुरुवातीसच त्यांना सर्वकाही चांगलेच दिसत असते. त्याचे मन हे खरेच कोऱ्या पाटीसारखे निखळ कोरे, निर्मल व स्वच्छ असते. त्या पाटीवर ज्ञानाची, अनुभवाची, मेहनतीची छाप पडण्याचे श्रेय पालक व शिक्षक यांचेच असते. आपले बालपण मुलांत पुनर्प्रस्थापित व्हावे असे पालकांना वाटत असले तरी, त्यासाठी त्यांच्यासह शिक्षक व समाजही तसाच सहयोगी उपलब्ध व्हायला हवा असतो. जीवनातील विविध जबाबदाऱ्या पार पडतानाही मुलांची साथ व सोबत व मात्यापित्यांच्या सर्वोच्च प्राधान्याची बाब असते. या जाणीवेच्या विविधरंगी सूत्राचे रेखांकन बालसंस्कार नीतित मांडण्यात आले आहे.
आपले बालपण स्वतःच्या हातात नसले तरी, मुलांचे व नातवंडांचे बालपण मात्र पालकच घडवित असतात. संस्कार व संस्कृतीच्या नावाखाली आधुनिकतेची झालर बालपणापासून प्रत्येक प्रौढ व्यक्ती या विचारांच्या दिमतीला उपलब्ध करते. यातील संस्कार कार्यप्रणालीत नवीन बालकपिढी, परंपरागत, मूल्याधारित खऱ्या सुख व आनंदास पारखी होत असल्याचे दिसून येते. जागतिकीकरणाच्या आधुनिक काळात जगण्याची गती सुपरफास्ट झाली तरी, जगण्याचे व त्यातील शाश्वत अप्रदूषित मूल्यांचे मुलभूत भानविकास प्रक्रियेतील सर्व साहाय्यक घटकांनी वेळीच ठेवणे आवश्यक ठरते.
बालसंगोपन साधताना आयुष्यात नवेपण हवे व तसे चितारण्याची जग फारच वैविध्यपूर्ण व तितकेच सुंदरही आहे हे नव्याकोऱ्या दृष्टीने पालकांनी विचारात घ्यायला हवे. आपल्या भावी बालकपिढीला मनाप्रमाणे घडवून, नवीन जगात मुक्त विहार कण्यासाठी अधिक सुंदर बनवता येईल. पालक व बालक या साखळीतील प्रत्येकाने एक एक पणती व्हायचा प्रयत्न केला तरी पाश्चिमात्य संस्काराने अंधारलेल्या संस्कारवाटा उजळून निघायला वेळ लागणार नाही. आपली मुलांच्या रूपातील नवीन सुदृढ पिढी या प्रकाशित वाटेला बालसंस्कार नितीच्या अनुपालनाच्या नवीन तंत्राने लख्ख उजळून टाकील व भविष्यातील आदर्श समृद्ध व्यक्तिमत्वाच्या भक्कम पाया बनेल. मातृत्व व पितृत्व लाभले की मुलांवर संस्कार कसे करायचे हे अंत:प्रेरणेने सहज समजायला लागते. हे अंशत: खरे असले तरी त्यातील उर्मीत मात्र लक्षणीय बदल झालेला असतो, कारण ती त्या स्वत्वातील निसर्गदत्त, कालसापेक्ष संकल्पित कार्यप्रणाली असते.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat