Summary of the Book
कादंबरी सोळाव्या शतकातील; परंतू तिची स्पंदनं मात्र कालातीत. याचं कारण तिचे अनेक पैलू आणि मनुष्य स्वभावाचा नागरिकांनी अतिशय खोलवर घेतलेला शोध. त्या काळातील वास्तव जिवंत करत असतानाच मेवाडच्या राजघराण्यातील अंतर्गत कलह आणि मानसिकता याचं चित्रण हा कादंबरीचा मुख्य गाभा. नगरकरांची पारदर्शक, नितळ आणि जिवंत भाषा मनाची पकड घेणारी. मग विषय कुठाचाही असो, राजकीय महत्वकांक्षा, हेवेदावे, युद्ध, जय-पराजय, भक्ती आणि धर्म तसेच विविध काला या सर्वांचाच आपल्या जीवनाशी संबंध जोडणारी ही कादंबरी आहे आणि मुख्य म्हणजे कादंबरीची गतिमानता वाचकाला पूर्णतः खिळवून ठेवते!