Home
>
Books
>
आध्यात्मिक
>
Ramdasi Dnyanopasana Va Panchikaran - रामदासी ज्ञानोपासना व पंचीकरण
रामदासी ज्ञानोपासना व पंचीकरण
9788193003947AadhyatmikManisha BatheRamdasi Dnyanopasana Va PanchikaranSamarth Media CenterSpiritualआध्यात्मिकमनीषा बाठेरामदासी ज्ञानोपासना व पंचीकरणसमर्थ मिडिया सेंटरसमर्थ रामदास स्वामी
Hard Copy Price:
25% OFF R 350R 262
/ $
3.36
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
सतराव्या शतकात रामदासी मठांद्वारे भारतभरातील अकरा राज्यांमध्ये 'अध्ययन-अध्यापनातून लोकशिक्षण-ज्ञानोपासनेच्या केंद्रांचे जाळे' कार्यरत होते! या मठांना तीर्थक्षेत्राचे स्वरूप न देता 'लोकशिक्षणाची' प्रेरक श्रद्धास्थाने बनवीत, 'रामदासी ज्ञानोपासक मठरचना' समर्थोत्तर अडीच शतके अंमलात येत राहिली. या मठ-अध्ययनांतील एक विषय-पंचीकरण ( प्रस्तुत ग्रंथातील पंचीकरण हस्तलिखित ). यात प्राचीन भारतीय वेदान्त परंपरेतील 'विश्व उत्पत्ती/ उभारणी व संहारणी' हा सिद्धान्त अर्थात Indian big-bang Theory आहे. पंचीकरण या विषयावर आर्षकालीन ऋषींपासून आद्यगुरु शंकराचार्य, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकाराम ते समर्थ रामदासांपर्यंत अनेक अद्वैतवादी ऋषी-संतानी वेदान्तात ( दाशोपनिषदांत ) सांगितलेला 'विश्व उभारणी-संहारणी सिद्धान्त' आपापल्या प्राकृत-व्यवहारी कालोचित भाषांमध्ये मांडणी करून रचनाबद्ध केला. एका अर्थाने याच परंपरेतील विसाव्या शतकातील ऋषितुल्य राष्ट्रपुरुष लोकमान्य टिळक... यांनी 'गीतारहस्यामध्ये' वरील सर्व सत्पुरुषांच्या सिद्धान्तांवर सखोल अभ्यास करून 'भारतीय मानवी उत्क्रांती' तत्त्वज्ञानाचा खुलासा 'पाश्चिमात्य राष्ट्रांसमोर' मांडला ! बरोबरीने गीतारहस्यात डार्विनसारख्या माकडापासून मानव निर्मिती म्हणणाऱ्या तत्त्वज्ञांपासून ते हेकेल, कान्ट अशा अनेक पाश्चिमात्य पंडितांचे खंडन करून भारतीय सांख्य, वेदान्त तसेच भगवदगीता, दासबोध आदींच्या पंचीकरणातील भूमिकादेखील स्पष्ट करीत. भारतीय 'मानवी उत्क्रांतीशास्त्राची गहनता' समजावली. त्यामुळेच समर्थांच्या पंचीकरणास लोकमान्यांचे निरुपण ही कालोचित कल्पना या ग्रंथात साकारण्याचा मी यत्न केला आहे. समर्थांच्या रामदासी मठांमध्ये जसे 'पंचीकरणासारखे' पारमार्थिक-विज्ञान-विषयांचे अध्ययन होत असे, तसेच रामदासी संप्रदायाच्या पारमार्थिक संघटनामध्ये अन्य संप्रदाय व त्यांच्या उपासना पद्धतींचे अध्ययनही होत असे. या अन्य संप्रदायांपैकी एक गट म्हणजे 'समर्थ पंचायतन' ! ज्या वेळी समर्थांनी समाधीच्या पूर्वी पंधरा महिने दक्षिण प्रांतात दौरा केला होता. त्या वेळी त्यांनी परतीच्या प्रवासात बसवकल्याणी ( कर्नाटक ) येथे या पंचायतनाचे 'संत संमेलन' घेतले होते. या संमेलनाचे आयोजनकर्ते शिवराम-पूर्णानंद अर्थात संत एकनाथांचे पणतू व समर्थ रामदास यांच्या अप्रकाशित इतिहासाला या ग्रंथात प्रथमच प्रकट केले जात आहे. यातून समर्थांचा कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागातील वावर-संपर्क व मठविस्ताराचे विराट दर्शन वाचकांना घडेल.