Summary of the Book
समाजिक जीवनात निवृत्तिवाद आणि त्यातून निर्माण होणारी निष्क्रियता समाजस्वास्थ्य बिघडवते. खोटया पारमार्थिक विचारसरणीने समाजातील विवेक, पराक्रम, पुरूषार्थ आणि प्रयत्नवाद संपुष्टात येतो. या सामाजिक संकटावर मात करण्यासाठी समर्थांनी वैयक्तिक आणि राष्ट्रीय प्रपंचाची योग्य घडी लावण्याकरिता कार्मवादाची गरज सिद्ध केली. सर्वांगीण निष्क्रियता आणि निवृत्तीवादाला आव्हान देणारे तत्वज्ञान त्यांनी मांडले.
आधुनिक काळातही समर्थांच्या या विचारांची निश्चितच गरज आहे. बुद्धीनिष्ठ व्यवहार, प्रयत्न आणि विवेक यांच्या आधारे प्रवृत्ती मार्गाची स्थापना करणे आवश्यक आहे.
व्यक्तिगत आणि सामाजिक पुण्यातून पारलौकिक हित साधण्याकरिता उदयोग आणि प्रयत्नाची कास धरून आधुनिक विचारांची मांडणी करणे हेच या ‘व्यवस्थापनबोधा’चे प्रयोजन!