Summary of the Book
आपल्या विदेश भेटींवरून भारतात कायम चर्चेत असलेले भारतीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचे परदेश दौरे किंवा भेटींचा आर्थिक, सामाजिक- सांस्कृतिक व सामरिक दृष्टीकोनातून विचार केल्यास भारतीय परराष्ट्र धोरणाचा वेध घेणारे चित्र आपणा समोर येते.
एकूण ६२ राष्ट्रांना वेळोवेळी भेटी देत त्यांनी आपल्या परराष्ट्रीय घोरणाची व्याप्ती वाढविली. आपल्या बहुतेक भेटींमध्ये श्री मोदी यांनी त्या राष्ट्रांसोबत उत्तम संबंध प्रस्थापित करण्यावर भर दिला. या भेटींचा सामरिक दृष्टीकोनातून विचार केल्यास भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून चीनच्या भोवतालच्या बहुतेक सर्वच राष्ट्रांना भेटी देत भारताच्या सामरिक नीतीची चुणूक दाखवून दिली. भरतीय सुरक्षा व सामरिक नीतीचा चीनबाबत विचार करतांना चाणक्यांनी दिलेल्या मंडल सिद्धांताचा दृष्ट्रांत मोदींच्या परदेश भेटींत दिसतो ते मंगोलिया जे चीन व रशिया दरम्यानचे भूसामरिकदृष्ट्या महत्वाचे व चीनच्या उत्तरेकडील सीमांसोबत सीमा असलेले राष्ट्र आहे, त्या सोबत उत्तम संबंध प्रस्थापित करण्यासाठी भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरतात. या सोबतच चीनच्या वायव्य सीमांसोबत सीमा असलेले काझाख्स्थान, किर्गिझस्तान, तजाकीस्तान व पूर्व सीमेकडील दक्षिण कोरिया व जपान तसेच दक्षिणेकडील भूतान, नेपाळ, म्यानमार या राष्ट्रांसोबतच दक्षिण चीन समुद्रासोबत जुळलेले लाओस, व्हिएतनाम, थायलंड, मलेशिया, फिलिपिन्स, दक्षिण कोरिया इत्यादी राष्ट्रांना भेटी देत या राष्ट्रांसोबत आर्थिक, व्यापारी, सामरिक, सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याचे ते प्रयत्न करतात.