भारतीयांच्या मनात रामायणाबद्दल नितांत श्रद्धा आहे. श्रीराम चरित्राने समाजजीवनावर अनेक संस्कार घडविले आहेत. हा संपूर्ण रामकथा गीतांमधून साकार करण्याची कल्पना आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे तत्कालीन सहनिर्देशक सीताकांत लाड यांना सुचली. ज्येष्ठ कवी ग. दि. माडगुळकर यांच्यावर गीते लिहिण्याची व सुधिर फडके यांच्यावर संगीत देण्याची जबाबदारी आली. या जोडगोळीने गीत रामायणाचे पहिले गीत १९५५ च्या रामनवमीला आकाशवाणीवरून सादर केले. आकाशवाणीवरून प्रसारित झालेली ५६ गीते, त्याच्या सादरीकरणाची पद्धत, त्या काळात घडलेल्या घटना, गदिमा, बाबूजी यांच्याबद्दल आठवणी अरुण गोडबोले यांनी 'अजरामर 'गीत रामायण' मधून सांगितल्या आहेत. शब्द आणि स्वर यांचा अद्वितीय संगम, सुरेल वाद्यमेळ यातून रामायणासारखी अजरामर कलाकृती निर्माण झाली. आज ६० वर्षानंतरही याची मोहिनी रसिकांवर का आहे, हे या पुस्तकातील अक्षरधनातून मिळते.
‘अजरामर गीत रामायण’ या पुस्तकाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5620110820411642002