Summary of the Book
यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे शिल्पकार होते. स्वातंत्र्यानंतर राज्याचा प्रत्येक क्षेत्रात विकास होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. राज्यात व केंद्रात सर्वाधिक मंत्रीपदे त्यांनी भूषविली. त्यांच्याकडे ज्या खात्याचा भार असे, तेथे त्यांनी आपल्या कामचा ठसा उमटविला. त्यामुळेच त्यांनी मोठमोठ्या जबाबदाऱ्या पेलल्या आणि यशस्वीही केल्या.व्यक्तिगत जीवनातही ते निर्मळ, सत्वशील व कुटुंबवत्सल गृहस्त होते.
कार्यबाहुल्यामुले वेळोवेळी प्रवास, अनेकदा घरापासून दूर जावे लागत असल्याने पत्नी वेणूताई त्यांच्याशी ते पत्ररुपाने संवाद साधत असत. त्यात पत्निविषयी काळजी, आरोग्याची काळजी व्यक्त होत असे. त्या काळातील पत्रे वा त्यांनी वेळोवेळी केलेल्या राजकीय नोंदीचे संपादन रामभाऊ जोशी यांनी 'यशवंतरावांचे अंतरंग विरंगुळा'मधून केले आहे.
१९४६ पासूनच्या नोंदी व पत्रांमधून यशवंतरावांचे अंतरंग उलगडतात. त्यांचे निसर्ग, पुस्तकप्रेम, रसिकता, जीवनाबद्दल प्रांजळपणे केलेल्या लिखानारून भारतीय राजकारणाचे रंग दिसतात. म्हणूनच हे पुस्तक अभ्यासक व जिज्ञासू वाचकांसाठीही उपयुक्त आहे.