Summary of the Book
या कथा माणसांच्या आहेत. कथांमध्ये भवतालचा परिसर, वातावरण, शेती, व्यवसाय यांचे संदर्भ येतात किंबहुना कथा त्या संदर्भांसाठीसुद्धा घडतात, पण मुख्यतः या कथा माणसांच्या आहेत. ती माणसं आपला कस, आपली रग, आपले पोत, आपले गुणधर्म घेऊन जशी आहेत. तशी महेंद्र कदम यांच्या शब्दांच्या चपखल चिमटीत येतात. ते त्या माणसांच्या स्वभावांची वर्णनंही करत नाहीत कित्येकदा, पण कथानकाच्या अनुशंगानं त्यांचे स्वभाव उभे राहत जातात आपोआप, आपल्यापर्यंत येतात, हे महेंद्र कदम यांच्या लिहिण्याचं कसब आहे. कथा वाचता वाचता आपण त्यांच्यातल्या पात्रांच्या मनांमध्ये उतरत जातो आणि हळूहळू आपणच ते ते पात्र होत जातो.