Hard Copy Price:
25% OFF R 225R 168
/ $
2.15
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
लता गुठे लिखित 'संत चैतन्याचा मेळा' हे पुस्तक वाचयला सुरुवात केली की, वारकरी संप्रदायाच्या आधीची आध्यात्मिक, सामाजिक पार्श्वभूमी व संत ज्ञानेश्वरांच्या कार्याचा आलेख मनावर गारुड करायला सुरुवात करतो. त्यानंतर संतांच्या मांदियाळीतील संत रामदास, संत चोखा मेळा, संत जनाबाई, सावतामाळी, गोरा कुंभार, कृष्णभक्त संत मीराबाई, संत मुक्ताबाई, रामभक्त संत कबीर, संत तुळशीदास अशी एकापाठोपाठ एक एक संतचरित्रं, त्यांचं तत्वज्ञान व समाजातील योगदान असे परिपूर्ण लेख वाचायाल मिळतात. ते वाचताना आपलेही वैचारिक परिवर्तन होऊन खरा धर्म काय आहे? हेही समजते. "वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे" असं म्हणत निसर्गाशी एकरूप होणारे, "वेदांचा तो अर्थ आम्हांसीच ठावा, येरांनी वाहवा भार माथा" असं म्हणून कर्मकांड करणाऱ्यांना ठासून खडसावणारे तुकाराम अनंत आकाशासारखे व्यापक होऊन भेटतात. याप्रमाणे परमेश्वराचं खरं स्वरूप कळल्यावर संपूर्ण भारतभर वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार करणारे संत नामदेव. "कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी|" म्हणत माणसाने पत्करलेल्या कार्यात भगवंताचे अधिष्ठान असते हे सांगणारे सावतामाळी. "ऊस डोंगा परि रस नोहे डोंगा | भुललासी वरलिया रंगा |" म्हणत संत चोखामेळा हृदयात स्थान मिळवतात. गोरा कुंभाराचे विचार मनाला साद घालतात. त्याचप्रमाणे स्वयंप्रज्ञ, स्वयंप्रकाशित संत मुक्ताबाई, जनाबाई, मीराबाई यांच्या कार्याचे महत्व आणि त्यांचे विचार आपल्यापर्यंत लेखिका शब्दांच्या माध्यमातून रसाळ शैलीत पोहोचविते. सर्वच संतानी अंधश्रद्धा, कर्मकांड, उच्च नीचता या समाजघातक गोष्टींवर निर्भीडपणे वार केले. पारमार्थिक विचार जनमानसात रुजवण्याचं काम संतांनी केले. याचे यथार्थ वर्णन लेखिका मोजक्या शब्दांत करते. आजच्या ताण-ताणावग्रस्त सामाजिक वातावरणामध्ये 'संत चैतन्याचा मेळा'सारख्या साहित्यकृतीची खूप गरज आहे. या सुंदर लिखाणाच्या निमित्ताने लता गुठे यांना पुढील साहित्यप्रवासासाठी अनेक शुभेच्छा प्रदान करते. आणि मनापासून अभिनंदन करते.