Summary of the Book
भारताच्या मध्ययुगीन काळात राजस्थानमधील मेवाडच्या महापराक्रमी राजा प्रतापसिंह याच्या शौर्याने आजही भारतीयांचा ऊर भरून येतो. तुर्कांशी त्याने दिलेल्या लढ्याचे वर्णन आजही केले जाते. १५७२ ते १५९७ अशी २५ वर्षे राज्य केले.
आपल्या मातृभूमीसाठी सर्वस्वाची आहुती देणाऱ्या या परमवीराची कथा, त्याच्या यशापयशाची प्रेरणादायी गाथा डॉ. भारती सुदामे यांनी प्रणवीर महाराणा प्रताप यातून लिहिली आहे. महाराणा प्रताप, मेवाड, त्याचा प्रिय चेतक घोडा आणि हल्दी घाटची लढाई, हाच इतिहास माहीत असणाऱ्यांना या कादंबरीतून महाराणांचे प्रामाणिक चरित्र समजते. देदीप्यमान पुरुषाची राष्ट्रप्रेमाने भारलेली ही कहाणी नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे.