Summary of the Book
भारतीय लोकांमध्ये एक गुण आपण असा पाहतो की, आपण देवालाही विसरूही शकत नाही आणि आईलाही विसरू शकत नाही. आपण देवाला आठवले की आई आठवते आणि आपल्याला आईची आठवण झाली की देवही आठवल्याशिवाय राहत नाही. आपल्याला थोडीशी तरी दुखापत झाली की लगेच आपल्या मुखातून साहजिकपणे उद्गार बाहेर पडतात, "आई ग!" वास्तविक 'होता दुःख, देवासी सांगावे' असे आपण म्हणतो. मात्र आपल्याला जरासे जरी दुःख झाले तर आपण आईचे नाव प्रथम घेतो. म्हणून आपल्या दृष्टिकोनातून देवाला जोडलेली कोण असेल तर ती माझी आई, माता असते. आपल्या जीवनात प्रथमतःच देवाशी आपली ओळख करून देणारी जर कोणी असेल तर ती आपली माता आहे. त्या दृष्टिकोनातून देवाचे पदार्पण, ईश्वरनिष्ठेचे अधिष्ठान जर मला कोणी करून दिलेले असेल तर ते माझ्या आईने करून दिलेले आहे.