Summary of the Book
'ऋजुला' हा चारोळी संग्रह आस्वादताना मला आशय व अभिव्यक्ती यांचे सायुज्य प्रकर्षाने जाणवले व यांतील काही चारोळ्या माझ्या मनात घर करून राहिल्या. वेगवेगळ्या संवेदना, भावना, कल्पना व विचार यांचे रंगतरंग या चारोळ्यांमधून आत्मीय उत्कटतेने प्रकट झाले आहेत. प्रीतीमधली कातर हुरहूर, असीम उत्कटता, भावनेची कोवळिकता, विरहातील आतुरता, संपूर्ण आणि तरीही स्त्रीत्वाचा कोदंड, सार्थ व भावभावनांच्या सुखद हेलकावे अनुभवत राहतो, हे चारोळी संग्रहाचे वैशिष्ट्ये आहे. कवयित्रींच्या शब्दांमध्ये आशय करण्याची सहज शैली आहे. यापेक्षा पुढचे क्षितिजावर मूकपणे प्रभांकित असलेले गगन त्यांनी त्यांच्या शब्दकवेत जोजवावे, ही सदिच्छा !