Summary of the Book
मानवाला इतर प्राणिजाताकाप्रमाणे अन्य बाह्य शक्ती मिळालेली नाही. त्याने त्याच्या स्वतःचा विकास स्वतः साधण्याचा प्रयत्न केला आहे. रक्षणासाठी त्याने समूह स्थापन केला. त्यातून समाज, धर्म यांची निर्मिती झाली. उच्च-नीचता, ज्येष्ठ-कनिष्ठ, रूढी-परंपरा आदी संकल्पना आल्या. मालकी हक्कासाठी युद्धे होऊ लागली. आज एकविसाव्या शतकात असुरक्षितता, भीती वाढली आहे. राजकीय, सामाजिक परिस्थितीत माणसाच्या मुळाचा, त्याच्या विकासाचा शोध घेण्यासाठी प्रमुख धर्माच्या प्राचीन वाङमय, विविध ज्ञानशाखा यांचा वापर रावसाहेब कसबे यांनी 'मानव आणि धर्मचिंतन' मधून केला आहे. हे चिंतन व्यापक व सखोल आहे.