Summary of the Book
जो पर्यंत पृथ्वीवर पर्वत व नद्या आहेत तोपर्यंत जगात रामायणकथा जिवंत राहील,’ हे ब्रह्मदेवाने वाल्मिकीऋषींस रामचरित्र काव्य लिहिण्यास सांगताना जे आश्वासन दिले ते आजपावेतो तरी खरे ठरले आहे. रामायण महाकाव्य हे जगातील आद्य महाकाव्य असून ते अद्यापि अत्यंत लोकप्रिय आहे, व त्याची अवीट गोडी अनुभविली नाही असा हिंदुमात्र विरळा. या महाकाव्याच्या आधारे कित्येक भाषासाहितांतून आखाने, कथा, कहाण्या, गीते इत्यादी रचिली गेली आहेत. त्र्यं. ग. बापट यांच्या लेखणीतून उतरलेली रामायणकथा अशीच रसाळ आणि वाचनीय आहे.