Sagar achalkar
22/11/2018
किरण येले कवी, नाटककार म्हणून तसे परिचित आहेतच. कथाकार म्हणून त्यांचा हा पहिलाच संग्रह. त्यांच्या कथा तशा दिवाळी अंकातून प्रसिद्ध होतंच असतात. पण एकत्रीत संग्रहच्या रूपाने वाचकांसमोर जाण्याचा आनंद वेगळाच असतो.
या संग्रहातली प्रत्येक कथा ही गुंतून ठेवणारी आहे. आणि मला वाटतं एखादी कथा वाचकाला आवडण्यासाठी हे एक वैशिष्ट्य पुरेसं आहे. काही कथांमध्ये कादंबरीचा आवाका असल्याचा जाणवतो आणि काही कथांमध्ये त्यांच्यातला नाटककार डोकावतो. त्यांच्यातला कवी तर नेहमीच त्यांच्या सोबत असावा असं वाटतं. कथा, कविता, नाटक या तिन्ही फॉरमॅट मध्ये लिखाण करणे तसे अवघडच परंतु तिन्ही बाजू उत्तमरित्या संभाळून वाचकांना त्याची दखल घ्यायला लावणे त्याहून अवघड. किरण येलेंच्या प्रत्येक साहित्यकृतीची वाचक दखल घेतातच.
महानगरीय जीवन जगताना येणाऱ्या समस्या, त्यांचे प्रश्न, मनातलं द्वंद्व, कधी स्वतः विरुद्ध केलेला बंड, कधी समाजा विरुद्ध केलेला बंड, मनातली जीवघेणी अस्वस्थता, तगमगता या सगळ्या गोष्टी त्यांच्या कथानकात डोकावतात. 'साईन आऊट' कथेतलं आदित्य हे पात्र तसा अनेकांनी अनुभवला असेल. परंतु या कथाणकाचा शेवट शर्माकाकूंच्या