Summary of the Book
एका आधुनिक दृष्टिकोनातून केलेली ही मराठी कवितेच्या परंपरेची समीक्षा आहे. या ग्रंथात तेरावे ते सतरावे शतक या काळातील ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि रामदास यांच्या कविता विश्वाचा विस्ताराने आढावा घेतला आहे. तसेच निवृत्तीनाथ, सावता माळी, सेना नाव्ही, नरहरी सोनार, गोराकुंभार आणि चोखामेळा यांच्या कवितेचे मर्म सांगितले आहे. विशेष म्हणजे जनाबाई, मुक्ताबाई, सोयराबाई, कान्होपात्रा या कवयित्रींनी स्त्रीमुक्तीची आपआपली परी कशी शोधून काढली, यांचे विस्तृत विवेचनही येथे आहे. स्त्रीवादी समीक्षेला उपयुक्त होईल असे हे विवेचंन आहे.