Summary of the Book
प्रेमचंद ह्यांनी विविध प्रकारच्या अंदाजे ३०० कथा लिहिल्या आहेत. ह्या कथा संग्रहात त्यांच्या निवडक ११ कथांचा समावेश करण्यात आला आहे.
ते मानवी संवेदना शब्दबद्ध करत. ते समग्र मानव जातीचे लेखक होते. त्यांनी दलित आणि उपेक्षित समाजाचे चित्रण आपल्या कथातून केले म्हणून त्यांना दलित कथाकार म्हणणे बरोबर ठरणार नाही. ज्या समाजात ते राहिले, त्या समाजाचा जगण्यासाठीचा संघर्ष त्यांनी मांडला. त्यांच्या लहानशा कथेत ते विषयाला भिडतात आणि समाजाचे भीषण वास्तव आपल्या समोर ठेवतात. ते वास्तव एव्हडे प्रखर असते की आपण सुन्न होऊन जातो. ह्या कथा खूप पूर्वी लिहिल्या आहेत पण आजही ह्या कथातील वास्तव गाव पातळीवर फारसे सकारात्मक रीतीने बदलले आहे असे वाटत नाही. सत्मेव जयतेने हे वास्तव नुकतेच आपल्या समोर फार प्रभावीपणे मांडले. त्यांच्या 'सदगती ' ह्या कथेवर सत्यजित रे ह्यांना सिनेमा काढावासा वाटला हेच ह्या कथेचे मोठेपण आहे.
ह्या कथा आपल्याला जीवनाकडे - आयुष्याकडे पाहण्याचा नवीन दृष्टीकोन देतील ह्या बद्दल शंकाच नाही.
एक चाकोरी बाहेरचे पुस्तक म्हणून वाचायला हरकत नाही. आपल्यातील माणूसपण जगविण्यासाठी ह्या वाचनाची आवश्यकता आहे.