Hard Copy Price:
25% OFF R 400R 300
/ $
3.85
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
सिंधू संस्कृतीच्या लोकांनी विहिरींचा शोध लावला. मोहोंजोदारोत दर तिसऱ्या घरात विहीर होती.इ.पू. २००० ते इ. पू. १५०० ही वर्षे थोड्या फार फरकाने साऱ्या जगभर अमेरिका , ऑस्ट्रेलिया सोडून अवनतीची होती. तोच प्रकार इ.स. ५००-२००० या काळात झालेला दिसतो आणि डॉ. पाठकांनी वर्णिलेल्या बारवा याच काळातील आहेत . त्यामुळे या काळात बारवा खोदल्या गेल्या. या काळातील पाण्याचे दुर्भिक्ष्य संस्कृत वाङ्मयात प्रतिबिंबित झाले आहे . दण्डीनच्या दशकुमारचरितात त्याची भयानक वर्णने आहेत. बहुसंख्य बारवा याच काळातील आहेत आणि त्यांच्यामुळे आपले पूर्वज कसेबसे तग धरून राहिले . संत तुकाराम , समर्थ रामदासांनी त्यांची हृदयद्रावक वर्णने आपल्या लेखनातून केली आहेत. पाठकांनी या विषयावर अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिले. त्याचे निश्चित स्वागत होईल. महाराष्ट्र ही पाठकांच्या संशोधनाची सीमारेखा असली तरी बारवांचा (पुष्करणी) उदय ताम्रपाषाण संस्कृती इतका पुरातन आहे. मोहेंजोदडो आणि हडप्पा येथील उत्खननात आढळलेली महास्नानगृहे ही याची उत्तम उदाहरणे आहे. म्हणजेच स्नानाने शुचित्व ही कल्पना किती पुरातन आहे याची प्रचिती येते. त्याचप्रमाणे ऋग्वेद कालात व स्मृती ग्रंथातही विहिरी तथा बरवांचे अनेक उल्लेख आढळत असल्याचे दाखविले आहे.पौराणिक साहित्यामध्ये ही या संबंधातील अनेक स्न्धार्भ दिलेले आहेत. तसेच बुधः जातक कथांमध्ये आणि जैनांच्या सूत्र वाङ्मयामध्ये त्यांचे भिन्न संदर्भात निर्देश आढळतात. थोडक्यात बारव निर्मितीला प्रदीर्घ ऐतिहासिक बैठक असल्याचे सांगितले आहे.असे असूनही बारव स्थापत्य अद्याप उपेक्षित राहिल्याची खंत डॉ. पाठकांनी व्यक्त केली आहे. या क्षेत्रात वावरणाऱ्या प्रस्थापित विद्वानांनी याकडे आस्थेवाईकपणे पाहिले नाही तथापि या कामामुळे ही उणीव भरली गेली आहे.