varsha khamkar
02 Mar 2018 10 29 AM
भवताल’च्या निमित्ताने ...
माणूस म्हटले की, त्याला व्यक्त व्हायची गरज असतेच. कुणी बोलतो, कुणी स्वरांचा आधार घेत तर कुणी रंगरेषांचा... या साऱ्यांचा आधार घेत खरेतर या सगळ्याला आधार देत व्यक्त होतो तो कवी असतो. कवितेत चित्र असतं, गाण असतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अत्यल्प शब्दांत काळजापर्यंत पोचणारे भाव असतात.
असेच काही शब्द घेऊन एक अचंबित करणारा भवताल आपल्यासमोर आणला आहे शांताराम खामकर उर्फ शाम यांनी. ‘भवताल’ या अनोख्या नावापासूनच या काव्यसंग्रहाचे वेगळेपण दिसून येते. कवीचे वेगवेगळ्या स्तरांवरचे भावविश्व आत उलगडले आहे याचे सूचक असणारे मुखपृष्ठ, जे कवीच्या सुप्त मनाचे द्योतक आहे. नेणिवेच्या प्रदेशात जे काही जाणवले ते जाणिवेत आल्यावर शब्दबद्ध केले आहे हे सांगणारे सुरेख चित्र रंगवले आहे मझरीन मेमन यांनी. माणुसकीची चाड आणि संघर्षाला भिडणे हा कवीचा स्वभावधर्म असावा हे प्रतीत होते अर्पण पत्रिकेतून.
या संग्रहाची चार भागांत विभागणी केली आहे. व्यष्टी ते समष्टी असा हा प्रवास उलगडतो. ‘आत्मधून’मध्ये कवी स्वतःच्या आत काय चालू आहे याचा शोध घेतो. - आरती देवगावकर