Summary of the Book
मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत डहाके यांचा हा समीक्षाग्रंथ कवितेचा सखोल विचार करतो. कविता म्हणजे काय, कवितेची समीक्षा कशी करायची याबाबत ते मार्गदर्शन करतात. 16 प्रकरणांमधून त्यांनी कवितेचा सर्वांगीण विचार केला आहे. मर्ढेकरांची कविता, विंदा करंदीकरांच्या कवितेतील प्रयोगशीलता कुसुमाग्रजांची कविता याबद्दल त्यांनी चर्चा केली आहे. नव्वदोत्तरी कविता, दलित कविता आणि कवितेच्या विकासात अनियतकालिकांचं योगदान या विषयावर मत मांडताना लेखक आजच्या कवयित्री आणि त्यांच्या कविता यांचीही समीक्षा एका लेखात करतात. काव्यपर्व या संग्रहाची समीक्षा करणारा लेकही यात आहे. कविता समजून घेण्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचं आहे.