Hard Copy Price:
25% OFF R 200R 150
/ $
1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
One of the finest novel read by me is Ojasvi ,written by Madhav Joshi. I have learnt in English medium but everyone at home speak in Marathi. My elder brother is on Air Force , who recommended me to read this novel. I was little hesitant to read Marathi novel, but when I started reading it, I was amazed to see simple and easy language used by the author. The hero of this novel is a young man from rural part of Maharashtra who has a dream to join forces and serve our beloved country. This hero joins Air force and got unique opportunity to fight three wars , i.e. 62,65 ,& 71 war. All the descriptions of wars is mind blowing and takes reader to actual battlefield. The hero is a man of principles and while retiring from forces, his suggestion to his bosses was amazing . If the bosses would have accepted his request, then today we would have seen peace on Kashmir border. I loved to read this novel. Hats off to the author as well as to the publisher viz. Soham creation and publications from Pune for publishing this
अजय पाटील
16/06/2021
माझ्यासारख्या तरुणाला सैन्यात जाण्याची खूप इच्छा आहे, लहानपणापासून मी शौर्याच्या कथा वाचत आलोय. माझ्या एका मित्राने माधव जोशी लिखित ओजस्वी ही कादंबरी मला वाचायला रेकमेंड केल्यावर मी त्याचीच कॉपी वाचून काढली. एकदा बसलो ते कादंबरी वाचून संपल्यावर च उठलो. अतिशय रोमांचकारी वर्णने वाचताना मला सैन्याचे अधिकाधिक आकर्षण वाटू लागले.
कथेचा नायक भाऊ देशमुख ह्याला लहानपणापासूनच सैन्यात जायचे असते. जुन्नर गावातील जन्म हा त्याच्यासाठी चांगला योगच होता. शिवाजी महाराजांनी 16 व्या वर्षी घेतलेली शपथ हा तरुण आपल्या इतर 4 मित्रासोबत शिवनेरीवर जाऊन घेतो. पुढे 62, 65 व 71 सालच्या युध्दात त्याला भाग घ्यायला मिळतो. युध्दाची रोमांचक वर्णने लेखकाने लिहिलेली आहेत. वाचताना अंगावर काटा येतो. विशेषतः 62 सलच्या युद्धानंतर भाऊ 50 दिवस हरवलेला असतो त्यावेळची वर्णने चित्तथरारक आहेत.
एकंदरीत, ही कादंबरी वाचून माझी सैन्यात जाण्याची उर्मी अधिकच वाढली व त्यासाठी मी लेखकाचे आभार मानतो. तसेच अशी छान कादंबरी प्रकाशित करणाऱ्या सोहम प्रकाशनाचे सुद्धा आभार.
सर्वांनी ही कादंबरी जरूर वाचावी असे माझे मत आहे.
रमेश दुर्वे
26/02/2021
ही कादंबरी म्हणजे 1962 ,65 आणि 71 साली भारताला लढाव्या लागलेल्या तीन युद्धात प्रत्यक्ष सहभागी असलेल्या भारतीय हवाई दलातील एका इंजिनियरने दाखवलेल्या दैदिप्यमान साहसाचे प्रत्ययकारी वर्णन आहे. यंदाच्या वर्षी १९७१ साली भारताने मिळवलेल्या उज्ज्वल यशाचा सुवर्णमहोत्सव साजरा होत असताना ही कादंबरी प्रकाशित होणे हा म्हणजे दुग्ध शर्करा योगच म्हणायला हवा.
बालपणापासूनच राष्ट्रप्रेमाचे बाळकडू मिळालेला एखादा तरुण पुढे आपल्या देशासाठी काय करू शकतो हे जाणून घेण्यासाठी ही कादंबरी मुळातच वाचणे श्रेयस्कर.
ही कादंबरी वाचून पाच पन्नास जणांना जरी सैन्य दलात भरती होऊन देशसेवा करण्याची स्फूर्ती मिळाली पाहिजे..
ह्या सारख्या कादंबऱ्या ह्या वाचून देशप्रेमाचे स्फुल्लिंग मनात पेटते.
लेखकाची ओघवती भाषा पुढे काय असेल ते वाचायची उत्सुकता सतत मनात कायम ठेवते. त्यासाठी लेखकाचे अभिनंदन .