Summary of the Book
मानवाने कितीही प्रगती केली, तरी निसर्गापुढे तो खुजा आहे. दुष्काळ, भूकंप, वादळ अशा प्रसंगी ते प्रकर्षाने जाणवते. निसर्गाचे रौद्र रूप मानवाला होत्याचा नव्हते करते. याचा अनुभव नोव्हेंबर १९७७ मध्ये आंध्र प्रदेशच्या सागरी किनारपट्टीला चक्रीवादळाचा तडाखा बसला आणि एकच हाहाकार उडाला.
वादळाबरोबरच मुसळधार पाऊस, सागराच्या लाटांनी उद्ध्वस्त केलेली जमीन, तीस हजार माणसांच्या मृत्यूचे तांडव देशाने पाहिले. त्याचे चित्रण प्रभाकर पेंढारकर यांनी ‘चक्रीवादळ’ या कादंबरीत केले आहे. सत्य घटना, प्रसंग, यामुळे निसर्गाने निर्माण केलेले एक भयाण वास्तव पुढे येते.